बीड – राज्यातील शाळांना दहा नोव्हेंबर पर्यंत देण्यात आलेल्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे,त्यामुळे आता 17 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार आहेत .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात सुरू झालेल्या शाळा दिवाळी निमित्ताने 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते.यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गात नाराजी पसरली होती.
दरम्यान बुधवार पासून शाळा सुरू होणार असल्याने सुट्टीवर गेलेले विद्यार्थी अन शिक्षक घरी परतले होते.मात्र शासनाने आता मंगळवारी एक पत्रक काढून 16 नोव्हेंबर पर्यंत सुट्या वाढवल्या आहेत.त्यामुळे शाळा आता 17 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने हे पत्रक काढल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने देखील पत्रक काढून सुट्या वाढवल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी ज्या शाळांमध्ये राष्ट्रीय परीक्षा आहेत त्या शाळा सुरु राहतील असे पत्रकात म्हटले आहे.