मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री आणि वाझे वसुली प्रकरणातील ईडी च्या रडारवर असलेले अनिल देशमुख यांना अखेर मंगळवारी सक्त वसुली संचनालाय ने अटक केली.अकरा तासापेक्षा अधिक काळ चौकशी केल्यानंतर देशमुख यांना अटक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का मानला जात आहे.
ईडीचे मुंबईतील अधिकारी सुलतान यांनी सकाळी अकरापासून देशमुख यांची चौकशी सुरू केली होती. रात्री आठनंतर ईडीचे दिल्लीतील अधिकारी सत्यव्रतसिंह हे मुंबईत दाखल झाल्यानंतर देशमुख यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
ईडीच्या अटकेच्या कारवाईपूर्वी देशमुख यांनी एक निवेदन प्रसिद्धिस दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपांनंतर ईडी, सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य केले. मला पाठवलेल्या समन्सलाही मी लेखी स्वरूपात उत्तर देत आलो. मा. उच्च न्यायालयाने मला सांविधानिक हक्कांतर्गत विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तरीही मी आज ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहून पुढील चौकशीस सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गेले ४ महिने बेपत्ता आहेत, यातूनच त्यांच्या आरोपांतील खोटारडेपणा समजतो आहे. त्यांच्यावरही अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत. याचाही विचार व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले होते.
ईडीने गेल्या सहा सात महिण्यापासून देशमुख यांना अनेकवेळा समन्स पाठवुन चौकशी ला बोलावले होते,या विरोधात देशमुख हे सर्वोच्च न्यायलयापर्यंत गेले होते,मात्र त्यांना दिलासा मिळालाच नाही,अखेर सोमवारी देशमुख हे ईडी समोर हजर झाले.त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली अन अटकेची कारवाई पार पडली.