Tag: #bjp
-
लोकसभा निवडणुकीची घोषणा !
4 जूनला होणार मतमोजणी ! महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान ! नवी दिल्ली- देशातील लोकसभा निवडणूक 2024 सात टप्यात होईल.पहिला टप्पा 28 मार्च पासून सुरू होईल.19 एप्रिल ला मतदान होईल.तामिळनाडू,राजस्थान,छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि बिहार.दुसरा टप्पा 28 मार्च ते 26 एप्रिल ला मतदान होईल. 12 एप्रिल ते 7 मे दरम्यान तिसरा टप्पा यात 12 राज्यात निवडणूक होईल.चौथा…
-
शेतकऱ्यांना कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ- मुख्यमंत्री !
मुंबई – शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प – जनसमर्थचा शुभारंभ दूकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे. डिजीटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान…
-
शनिवारी लागणार आचारसंहिता !
नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्या दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद चे आयोजन केले आहे,यामध्ये आगामी 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणीच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे.त्यामुळे उद्या दुपारी चार वाजेपासून आचारसंहिता लागेल. देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16)…
-
प्रीतम ला विस्थापित होऊ देणार नाही- पंकजा मुंडे !
मुंबई- भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंकजा यांनी आपल्या बहीणीचं तिकीट कापून आपल्याला उमेदवारी मिळाली असली तरी प्रीतम ताईला आपण विस्थापित करणार नाही, असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. “माझी उमेदवारी जाहीर झाली ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक आहे. त्यामुळे माझ्या भावना आभाराच्या…
-
पंकजा मुंडे, रक्षा खडसे यांच्यासह राज्यातील वीस उमेदवार जाहीर !
नवी दिल्ली -भारतीय जनता पक्षाने देशातील 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.यामध्ये महाराष्ट्रातून वीस नावे जाहीर झाली आहेत.नागपूर मधून नितीन गडकरी,बीडमधून पंकजा मुंडे,पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अखेर भाजपने बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये मोदी-शाह यांनी काही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे. तर काही…
-
देशात सीएए लागू !
नवी दिल्ली- केंद्र सरकारने सीएए कायद्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधील शरणार्थी नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. सीएए कायदा लागू झाल्यानंतर आता जे शरणार्थी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात दाखल झाले आहेत. त्यांना भारताचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामध्ये मुस्लिमांशिवाय हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी या धर्माच्या लोकांचा समावेश…
-
ठाकरेंचे आ रविंद्र वायकर यांचा शिवसेनेत प्रवेश !
मुंबई- उद्धव ठाकरे गटाचे आ रविंद्र वायकर यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.वायकर हे गेल्या काही दिवसापासून ईडी च्या रडारवर होते,त्यामुळे त्यांचा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक…
-
पंकजा मुंडेंकडून लोकसभेचे संकेत !
शिरूर- लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या,पूढे मी तुमची काळजी घेईल असे म्हणत भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 195 उमेदवारांची घोषणा केली होती, मात्र त्यामध्ये महाराष्ट्रातून एकाही उमेदवारांची घोषणा झाली नव्हती. त्यामुळे राज्यातील उमेदवारांची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे….
-
युवराज,जहिरने जिंकली परळीकरांची मने !
परळी – भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराजसिंग आणि जहिर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत परळीत नाथ प्रतिष्ठानच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. पुढील वर्षी परळीत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा मानस कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. परळीची माती ही रत्नांची खाण आहे या मातीने महाराष्ट्र व देशाला अनेक क्षेत्रात विविध रत्ने दिली आहेत….
-
मोदी,अमित शहा यांच्यासह 195 उमेदवार जाहीर !
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 195 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह 34 मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातून एकाही नावाची घोषणा झालेली नाही. भाजपने पहिल्या टप्प्यात 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशाच्या 34 मंत्री आणि राज्यमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आले…