News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beednews

  • वादग्रस्त मुंडे पुन्हा बीड सिव्हिल हॉस्पिटलला !

    बीड- कोरोना काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी करून शासनाला चुना लावणारा स्टोर किपर अजिनाथ मुंडे हा पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात रुजू होण्यासाठी आला आहे.प्राप्त माहितीनुसार सीएस डॉ साबळे यांनी त्याच्याकडे स्टोर चा चार्ज देण्यास नकार दिला आहे.मात्र मुंडे यांनी थेट सीएम आणि आरोग्य मंत्र्यांकडे फिल्डिंग लावली आहे.रुग्णाच्या जीवाशी खेळत कोट्यवधी…

  • बीडमधील महिलेवर गँगरेप !

    माजलगाव- रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने एका महिलेवर मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड शहरातील कबाड गल्लीत हा भयंकर प्रकार सुरू होता.या महिलेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत चार जणांनी तिचे शोषण केले. रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून एका…

  • बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी ! संस्थाचालकांचा सहभाग असण्याची शक्यता !!

    बीड- बारावीच्या परीक्षेत मास कॉपी अर्थात सामूहिक रित्या पेपर सोडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवरील अक्षर सारखेच असल्याने बोर्डाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.हे सगळे विद्यार्थी अंबाजोगाई आणि हिंगोली येथील आहेत.परीक्षा देताना एकाच व्यक्तीने पेपर सोडवले का?एकाच ठिकाणी बसून हा सगळा प्रकार मॅनेज केला गेला का ?यामध्ये संस्थाचालक सहभागी आहेत…

  • पुन्हा नोटबंदी,कारण अस्पष्ट !!

     नवी दिल्ली- तब्बल सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या नोटबंदीचा नेमका हेतू काय अन दोन हजाराची नोट का चलनात आणली ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.अशातच येत्या सप्टेंबर महिन्यापासून दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहे.नागरिकांनी तोपर्यंत आपल्याकडील नोटा बदलून घ्याव्यात असे आवाहन आरबीआय ने केले आहे. 23 मे 2023 पासून…

  • शाळा दुरुस्तीच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली माहिती ! स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता कुलकर्णी यांनी निधी वितरित केल्याचा आरोप !!

    बीड- जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी डी पी डी सी च्या निधीमधून शाळा खोल्या दुरुस्ती आणि शाळा इमारत बांधकामासाठी तब्बल आठ कोटीच्या आसपास निधी मंजूर केला प्रत्यक्षात शिक्षण विभागाची मागणी साडेचार कोटीची होती मात्र जास्तीचा निधी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व त्यांच्या बगलबच्चांनी आपल्या जवळच्या गुत्तेदार पत्रकार राजकीय कार्यकर्ते यांना हा निधी टक्केवारी…

  • अप्पा जाधवची हकालपट्टी ! धोंडू पाटलांचे पद काढले !!

    बीड- शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांच्या कानाखाली आवाज काढणाऱ्या बीडच्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांचे संपर्कप्रमुख पद काढून घेण्याची कारवाई पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी केली आहे बीडमध्ये घडलेल्या प्रकारामुळे शिवसेनेत पैसे घेऊन पदे वाटले जातात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे शिवसेनेच्या वतीने राज्यभरात…

  • महाप्रबोधन यात्रेपूर्वी शिवसैनिक आपसात भिडले !जिल्हाप्रमुख जाधव यांची गाडी फोडली !!

    बीड- खा संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप स्थळी शिवसैनिक आपसातच भिडल्याची घटना बीडमध्ये घडली.उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात मारामारी झाली.वरेकर यांनी यावेळी जाधव यांची गाडी फोडली.हा सगळा प्रकार घडला त्यावेळी उपनेत्या अंधारे या देखील समोर होत्या हे विशेष. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये 20 मे रोजी होणार…

  • जिल्ह्यातील लाखभर लोकांना मिळणार रोख पैसे ! तुम्ही केलाय का अर्ज !!

    बीड- केशरी कुपन धारकांना यापुढे रेशन ऐवजी रोखीने पैसे मिळणार आहेत.राज्य शासनाने जानेवारी2023 पासून ही योजना लागू केली आहे मात्र त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यात केशरी कुपन धारक लाभार्थ्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे.त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे सुरू आहे,जसजसे अर्ज येतील तसतसा या योजनेचा लाभ थेट त्या लाभार्थ्यांना दिला जाईल अशी माहिती…

  • महाप्रबोधन यात्रेचा बीडमध्ये शनिवारी समारोप -अनिल जगताप !

    बीड- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये येत्या 20 मे रोजी होत आहे.या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिली. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते.पत्रकार परिषदेत संपर्क प्रमुख धोंडू पाटील,माजीमंत्री बदामराव पंडित,माजी आ सुनील धांडे,जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची…

  • मोदींचा रिजिजू यांना धक्का ! कायदामंत्री पद काढले !!

    नवी दिल्ली- देशाचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडील खात्याचा कारभार अचानकपणे काढून घेण्यात आला आहे.आता अर्जुन मेघवाल नवे कायदामंत्री असतील.गेल्या काही महिन्यांपासून न्यायाधीश आणि रिजिजू यांच्यातील वादामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  मोदी सरकारने कायदा मंत्री किरन रिजिजू यांच्या खात्यात बदल केला आहे….