News & View

ताज्या घडामोडी

Tag: #भाजप

  • लोकसभा निवडणुकीची घोषणा !

    4 जूनला होणार मतमोजणी ! महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान ! नवी दिल्ली- देशातील लोकसभा निवडणूक 2024 सात टप्यात होईल.पहिला टप्पा 28 मार्च पासून सुरू होईल.19 एप्रिल ला मतदान होईल.तामिळनाडू,राजस्थान,छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि बिहार.दुसरा टप्पा 28 मार्च ते 26 एप्रिल ला मतदान होईल. 12 एप्रिल ते 7 मे दरम्यान तिसरा टप्पा यात 12 राज्यात निवडणूक होईल.चौथा…

  • शनिवारी लागणार आचारसंहिता !

    नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्या दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद चे आयोजन केले आहे,यामध्ये आगामी 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणीच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे.त्यामुळे उद्या दुपारी चार वाजेपासून आचारसंहिता लागेल. देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16)…

  • अशोक चव्हाण,मेधा कुलकर्णी, अजित गोपच्छडे यांना भाजपची उमेदवारी !

    मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे.काँग्रेस मधून भाजपवासी झालेले अशोक चव्हाण, माजी आ मेधा कुलकर्णी आणि नांदेड चे अजित गोपच्छडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी देशभरातील 56 राज्यसभा उमेदवारासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र मधून 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातील सत्ताधारी…

  • अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश !

    मुंबई-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण आणि माजी आ अमरनाथ राजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपमध्ये घाऊक प्रवेश सुरू झाले आहेत.काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अनेकवेळा येत होत्या.अखेर त्यावर शिक्कामोर्तब…

  • अशोक चव्हाण,चंद्रकांत हंडोरे,नसीम खान भाजप वासी !

    मुंबई- गेल्या अनेक महिन्यापासून ज्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आपल्या समर्थक अकरा आमदारांसह आज सायंकाळी भाजप प्रवेश करणार आहेत.माजीमंत्री नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे हे देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अशोक चव्हाणांसह चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान हे देखील भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते…

  • मोदींनी मांडला दहा वर्षाचा लेखाजोखा !

    नवी दिल्ली- जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवण्याचा मुद्दा असो की राम मंदिर उभारण्याचा विषय,17 व्या लोकसभेने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, अनेक रेकॉर्ड केले अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामाचे कौतुक केले. लोकसभेतील आपल्या शेवटच्या भाषणात मोदी यांनी अनेक विषयांना हात घातला.ते म्हणले की,17 व्या लोकसभेने अनेक रेकॉर्ड केले…

  • मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल !

    नवी दिल्ली- राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला.काँग्रेसच्या काळात बेरोजगारी,महागाई वाढली आम्ही मात्र गेल्या दहा वर्षात कोट्यवधी रोजगारांची निर्मिती केली. जनतेचा आमच्यावर अतूट विश्वास आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत एनडीए 400 पार जाईल असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की,आमच्या सरकारने शेकडो कायदे रद्द केले, अमृत भारत आणि…

  • लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न !

    नवी दिल्ली- भारताचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.स्वातंत्र्य प्राप्ती पासून ते आजपर्यंत म्हणजेच पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ सक्रिय राजकारणात सहभाग असलेल्या अडवाणी यांना हा बहुमान मिळाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. लालकृष्ण अडवाणी हे  इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात…

  • लोकसभेपुर्वी राज्यसभेचा आखाडा !

    नवी दिल्ली- महाराष्ट्रासह गुजरात,उत्तरप्रदेश, बिहार अशा पंधरा राज्यातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.27 फेब्रुवारी रोजी मतदान आणि निकाल जाहीर होईल.या निवडणुकीनंतर भाजपचे राज्यसभेत बहुमत होईल. १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज सोमवारी केली. यासाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी…

  • नितीशकुमार भाजपसोबत !सम्राट चौधरी, विजय सिन्हा होणार उपमुख्यमंत्री !

    पटना- बिहारमधील जेडीयु आणि आरजेडी चे सरकार मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर कोसळले.सकाळी अकरा वाजता नितीशकुमार यांनी राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केला.भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असून मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितीशकुमार होणार असून भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोघे उपमुख्यमंत्री होणार आहेत. बिहारमध्ये गेल्या काही दिवसापासून सत्तेत असलेल्या जेडीयु आणि आरजेडी यांच्यात संघर्ष…