बीड- ऊसतोडणी करण्यासाठी कामगार आणि मुकादम यांच्याकडून दारू,मटण यासह विविध मागण्या करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास आता बंद होणार आहे.साखर आयुक्तालयाने याबाबत एक अभ्यास गट स्थापन केला असून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबणार आहे. ऊसतोडणी व वाहतुकीसंदर्भात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तेरा सदस्यांच्या अभ्यासगटाची नियुक्ती केली आहे. ऊस […]
एप्रिल अखेर धुराडी बंद होणार !
पुणे- गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर म्हणजेच एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्यात तब्बल 200 कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने आतापर्यंत 70 लाख टनांचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी जून अखेरपर्यंत ऊस गाळप हंगाम सुरू होता.अतिरिक्त उसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने कारखाने उशिरापर्यंत सुरू होते.मात्र यंदा कारखान्यांकडून उसाचे पूर्ण क्षमतेने गाळप […]
धनंजय मुंडे पंकजा मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक !
बीड-रक्ताची नाती असली तरी आमच्या राजकीय वैर आहे अस म्हणणाऱ्या बंधू धनंजय मुंडे यांना रक्ताची नाती कधी संपत नसतात अन मी कोणाशी वैर धरत नाही अस म्हणत बहीण पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं.या दोन्ही बहीण भावात आज चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही […]
यंदा कारखाने लवकर सुरू होणार !
बीड – गतवर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनल्याने साखर संघाने यावर्षी ऑक्टोबर पासूनच कारखाने सुरू व्हावेत यासाठी नियोजन सुरू केले आहे.ज्या भागात जास्त ऊस लागवड झाली आहे त्या भागातील कारखाने ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात दसरा ते दिवाळी या दरम्यानच ऊस हंगाम […]
मुंडे बंधू भगिनींच्या कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश !
पुणे – शेतकऱ्यांची एफआरपी ची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना च्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस माजीमंत्री पंकजा मुंडे आणि माजीमंत्री धनंजय मुंडे या बहीण भावाचे हे दोन कारखाने आहेत हे विशेष. राज्यात यंदा विक्रमी ऊस उत्पादन झाले.त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला […]
वैद्यनाथ च वाटोळं करून यांना झोप कशी येते – धनंजय मुंडे !
बीड- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यावर टीका केलीय.वारसा हक्काने कारखाना मिळाला ते गडगंज झाले मात्र संस्था उध्वस्त झाली,या लोकांना झोप तरी कशी येते अशी टीका त्यांनी केली. अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम समाप्ती कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.ते पुढे म्हणाले की,ज्यांना वारसा हक्काने कारखाना मिळाला, ते […]
मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास ठरतोय !
बीड- बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात जवळपास 24 लाख मेट्रिक टन ऊस अजूनही शेतात उभा आहे.बारा चौदा महिने झाले तरी तोड होत नसल्याने उसाला पांढरे तुरे आले आहेत.लाख मोलाचं पीक डोळ्यादेखत वाळून जात असल्याने शेतकरी हताश झाला आहे.राज्य सरकारने याबाबत स्थानिक प्रशासनामार्फत उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी मे अखेर पर्यंत कारखाने सुरू राहील तरी संपूर्ण उसाचे […]
वैद्यनाथ सुरू होणार का हे सांगा – धनंजय मुंडे यांचा टोला !
परळी – आम्ही कल्याणकारी आहोत की अकल्याणकारी हे जनता ठरवेल पण वैद्यनाथ साखर कारखाना यंदा सुरू होणार की नाही हे अगोदर सांगा अस म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांचे नाव न घेता टोला लगावला . सिरसाळा येथे परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्व पंडितअण्णा मुंडे व्यापारी संकुल […]
वैद्यनाथ, जयभवानी ब्लॅकलीस्टेड !
मुंबई – राज्यातील तब्बल 44 सहकारी साखर कारखान्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे काळ्या यादीत टाकण्यात आले आहे,यामध्ये माजीमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ करखाण्यासह माजी आ अमरसिंह पंडित यांच्या जयभवानी कारखान्याचा देखील समावेश आहे . गळीत हंगामासाठी तयार असलेल्या १९० कारखान्यांची नियमित ऊसदर देणे, विलंबाने उसाची रक्कम देणे आणि वेळेत ऊसदर न दिल्याने झालेली […]
वैद्यनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन !कारखाना बंद !!
परळी – तीन ते चार महिन्यापासून वेतन थकल्याने भाजप नेत्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कारखाना बंद करून गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे . भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी यावर्षी शेतकरी आणि कामगारांच्या मदतीने मोठ्या उत्साहात कारखाना सुरू केला होता .कारखान्याने दोन अडीच लाख साखर पोते देखील उत्पादित केले होते […]