मुंबई-अवैध धंद्यांना कायदेशीर पोलीस संरक्षण देत हप्ते वसुली करणाऱ्या डीवायएसपी जायभाये यांची तातडीने बदली करत ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.केज च्या आ नमिता मुंदडा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. जिल्ह्यातील धोक्यात आलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच फोफावलेले अवैध धंदे या प्रश्नावर यापूर्वीच्या विधानसभा अधिवेशनात […]
फडणवीस यांना दिल्ली दरबारी मानाचे पान !
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने नवीन निवडणूक समिती जाहीर केली असून यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. फडणवीस यांचा समावेश झाल्याने त्यांचा दबदबा दिल्ली दरबारी वाढल्याचे चित्र दिसत आहे. भाजपा संसदीय बोर्डात ११ सदस्य असतात तर केंद्रीय निवडणूक समितीत १९ सदस्य असतात. त्यात ११ संसदीय समितीचे सर्व सदस्यांचा समावेश असतो. […]
समूह राष्ट्रगीत गायन करण्याचे आदेश !
मुंबई- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभर अमृत महोत्सव साजरा केला जातोय.याचाच एक भाग म्हणून उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही जिथं असाल तिथं दोन मिनिटं थांबा,राष्ट्रगीत म्हणा अन मग पुढं जा असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने उद्या म्हणजे 17 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता समूह राष्ट्रगीत गायन केलं जाणार […]
सोमवारी बीड बंद !
बीड – शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आ विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर सोमवारी बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी म्हणून सोमवारी बीड जिल्हा बंद चे आवाहन केले आहे. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे लढवय्ये नेते तथा मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे माजी आ.विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाने बीड […]
शेतमजूर,रंगकाम ते तब्बल 25 वर्ष आमदार !
बीड- शालेय जीवनापासून जगण्याचा संघर्ष वाट्याला आलेल्या अन प्रत्येकवेळी संकटावर मात करून यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या स्व विनायक मेटे यांचा जीवनप्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखा आहे.शालेय जीवनापासून शेतात मजुरी,मुंबईत भाजी विक्री,भिंती रंगवणे अशी कामे करत करत मेटे आमदार झाले.त्यामुळेच मराठा समाजाच्या वाट्याला आलेला संघर्ष त्यांना माहीत होता, त्यासाठीच त्यांनी या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत […]
स्व विनायक मेटे यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार !
बीड- मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबई ला निघालेल्या माजी आ तथा शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले.त्यांच्या पार्थिव देहावर सोमवारी दुपारी साडेतीन वाजता बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 1996 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे,पाच वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून राज्यात वेगळी ओळख निर्माण करणारे माजी आ विनायक मेटे यांचा अपघातात […]
दुःखद ! विनायक मेटे यांचे अपघाती निधन !
मुंबई – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड […]
बावनकुळे नवे भाजप प्रदेशाध्यक्ष !
मुंबई- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या जागेवर आ चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती पक्षाने केली आहे.तसेच भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी आ आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाईल अशी चर्चा होती.विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांचा उत्तराधिकारी कोण […]
माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिलं नसेल !पंकजा मुंडे यांचा घरचा आहेर !!
मुंबई- राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मध्ये मंत्रिपद मिळण्याएव्हढी माझी पात्रता नसेल त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसेल अस म्हणत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. शिंदे फडणवीस सरकारचा लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला.शिंदे आणि भाजपच्या वतीने प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपकडून माजीमंत्री पंकजा मुंडे […]
पूरग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात !
मुंबई- राज्यातील पंधरा लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे.त्यामुळे राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये १५ लाख हेक्टर किंवा […]