News & View

ताज्या घडामोडी

Tag: #बीड न्यूज अँड व्युज

  • फुकटच्या आश्वासनावर खर्च होणार 62 हजार कोटी !

    कर्नाटक- भाजपला धक्का देत काँग्रेसने कर्नाटक मध्ये सत्ता ताब्यात घेतली.या विजयाचे श्रेय नेत्यांच्या मेहनतीला जसे आहे तसेच फुकटच्या आश्वासनाला देखील आहे.कारण काँग्रेसने फुकट वीज,महिलांना 2 हजार भत्ता आणि बेरोजगार युवकांना 3 हजार रुपये भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे.हे सगळं पूर्ण करायचं म्हटल्यास वर्षाकाठी 62 हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीवर ताण पडणार आहे. कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान…

  • कर्नाटकात काँग्रेसने मैदान मारले !

    नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने मैदान मारले आहे.दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसने 132 जागांवर आघाडी घेत 60 जागेवर विजय मिळवला आहे.तर सत्ताधारी भाजपने 64 जागांवर आघाडी घेत 21 जागेवर विजय मिळवला आहे. दरम्यान काँग्रेस ११८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७३ जागांवर पुढे आहे. तसेच काँग्रेसच्या सर्व…

  • जिल्ह्यात पंधरा दिवस जमावबंदी !

    बीड- पुढील पंधरा दिवस जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.या काळात मोर्चे,निदर्शने, आंदोलन,सभा,समारंभ ,रस्ता रोको आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे.अप्पर जिल्हा दंडाधिकारी संतोष राऊत यांनी ही माहिती दिली. बीड जिल्हयात दि. 14 मे 2023 रोजी छत्रपती संभाजी महाराज जंयती साजरी होणार आहे असून जिल्ह्यात राजकिय हलचाली व घडामोडी मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे, रास्ता…

  • आधी पक्षाबाबत निर्णय नंतर अपात्रतेबाबतचा – नार्वेकर !

    मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याची कारवाई करण्याचे अधिकार मला दिले आहेत,त्यामुळे सर्व बाजू तपासून पाहून,तपासणी,उलट तपासणी करून मगच निर्णय घेण्यात येईल.राजकीय पक्ष कोणाचा याचा निर्णय आधी होईल मग अपात्रतेबाबतचा होईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर नार्वेकर मीडियाशी बोलत होते.ते म्हणाले की,सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो….

  • सरला मुळे सभापती तर श्याम पडुळे उपसभापती !

    बीड- बीड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी सरला मुळे यांची तर उपसभापती पदावर श्यामराव पडुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती पद आ क्षीरसागर यांच्याकडे तर उपसभापती पद उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्याकडे गेले आहे. बीड बाजार समितीच्या निवडणुकीत आ संदिप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनल चा धुव्वा उडवत 15…

  • पोलीस निरीक्षकाला अटक !

    परळी- पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी परळी येथील पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना सीआयडी ने अटक केली आहे.अंबाजोगाई न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या घटनेने खळबळ उडाली आहे. 2014 साली परळी पोलीस ठाण्याच्या कोठडीत चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत सदर…

  • सर्वोच्च न्यायालयाची उद्धव ठाकरे यांना चपराक – मुख्यमंत्री शिंदे !

    मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे चपराक बसली आहे,आम्ही धनुष्यबाण आणि शिवसेना वाचवली अस म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आजचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल लागल्याबद्दल मी आमच्या सगळ्यांना शुभेच्छा मलाही दिल्या पण तुम्हाला देतो शुभेच्छा…

  • भाजपसोबत निवडणूक जिंकली अन खुर्ची साठी काँग्रेस सोबत गेलात तेव्हा नैतिकता कुठे गेली होती- फडणवीस !

    मुंबई- भाजपसोबत निवडणूक लढवली अन खुर्चीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलात तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की,या निकालाबद्दल अधिक पूर्ण समाधान व्यक्त करतो आणि निश्चितपणे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोक…

  • शिंदे,फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – ठाकरे !

    मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यावर ज्या पद्धतीने ताशेरे ओढले आहेत ते पाहता या दोघांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करत आपण राजीनामा दिला कारण ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासमोर मला विश्वास दर्शक प्रस्ताव मांडायचा नव्हता अस स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. राज्यातील सत्तासंघर्ष बाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मातोश्री येथे…

  • शिंदे सरकार वाचलं !राज्यपाल,फडणवीस यांच्यावर ताशेरे !!

    नवी दिल्ली- राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत घटना पीठाने 10 प्रश्न तयार करून सत्तासंघर्ष च प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवलं.त्यामुळे आता या प्रकरणात पुन्हा एकदा नवी तारीख मिळणार हे नक्की झालंय. सरकारवरील संकट यामुळे काही काळासाठी टळलं आहे हे नक्की.शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे.त्यामुळे शिंदे सरकार वाचलं आहे हे नक्की….