मुंबई – आपल्या अभिनयाने करोडो फॅन्स च्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे .दोघांनी एक निवेदन प्रसिद्ध करत आपला निर्णय जाहीर केला आहे .पंधरा वर्षांपासून संसार करणाऱ्या या दोघांना दहा वर्षाचा मुलगा आहे .त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे .
मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता अमिर खान याने आपल्या पत्नी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. जरी हा अमिर आणि किरन यांचा दोघांचा निर्णय असेल तरीही, या वृत्ताने त्यांचा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे .
घटस्फोटाविषयी निवेदन जारी करत त्यांनी लिहिले, “की सुंदर वर्षात आम्ही आयुष्यभराचे अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केले आहे आणि आमच्या नात्यात फक्त विश्वास, आदर आणि प्रेम वाढले आहे. आता आम्ही आमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू करू इच्छितो. यापुढे पती-पत्नी म्हणून नव्हे, तर एकमेकांसाठी सह-पालक आणि कुटुंब म्हणून राहू.”
महत्वाचे म्हणजे, आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. त्याचे पहिले लग्न रीना दत्ताशी झाले होते. हे नातेही जास्त काळ टिकू शकले नाही आणि लग्नाच्या काही वर्षांनंतर त्याचा घटस्फोट झाला. त्याने किरण रावसोबत २८ डिसेंबर २००५ रोजी लग्न केले होते. तर लग्नाच्या तब्बल १५ वर्षांनी घटस्फोटाची घोषणा केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.