मुंबई – राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे .यानुसार नियम कडक केले असून जाहीर कार्यक्रम, धार्मिक स्थळ बंद केले असून लग्नासाठी 50 आणि अंत्यसंस्कार साठी 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे .
राज्यातील सर्व रेस्टॉरंट, थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र यावेळी नियम अधिक कडक करण्यात आले असून मास्क शिवाय कोणालाही आत येण्याची परवानगी नसेल.
याशिवाय आस्थापनांमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायजर लावणं ही बंधनकारक करण्यात आलं आहे. दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्यास कोरोना महासाथ जाईपर्यंत ते रेस्टॉरंट किंवा थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असंही गाइडलाइन्समध्ये जारी करण्यात आलं आहे.
2याशिवाय शॉपिंग मॉल्सनाही हे नियम अनिवार्य राहतील.महत्त्वाचं म्हणजे राज्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
लग्न समारंभासाठी 50 लोकांना परवानगी असेल तर अत्यंसंस्कारात 20 पेक्षा जास्त जणांना परवानगी नाही