मुंबई – मुंबई सह काही महानगरातील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर आता राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसापासून वाढ होत आहे.विशेषतः मुंबई आणि इतर महानगरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर शाळा बंद केल्यानंतर आता महाविद्यालयात देखील वर्ग बंद करण्याचा निर्णय झाला आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,15 फेब्रुवारी पर्यंत विद्यापिठ आणि महाविद्यालय बंद करण्यात येणार आहेत.नेमकं काय म्हणाले सामंत हे पाहुयात.
राज्यातील अकृषी विद्यापीठे,अभिमत , स्वयं अर्थसहाय्यीटविद्यापीठे, तंत्रनिकेतन,शैक्षणिक संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार,परीक्षा ही ऑनलाईन होणार
,काही कारणास्त्व विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांना उपस्थित न राहिल्यास शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना परीक्षेची संधी द्यावी
प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन ते बंद करण्याचा निर्णय
परदेशी विद्यार्थ्यांना वसतिगृहात काळजी घेऊन राहता येणार
महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना
विद्यार्थ्यांसोबत शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना
50 टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरु राहणार
हे सगळे नियम खासगी विद्यापीठे, शिक्षणसंस्था, स्वायत्त महाविद्यालयांना लागू राहणार .