मुंबई – शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिलं आहे. विधानसभेच्या विधीमंडळ बैठकीस गैरहजर राहाणाऱ्या 12 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उपस्थित राहण्याचं पत्र काढलं होतं, यावर एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. या आरोप प्रत्यारोपांनंतर शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र देत बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे.
जे आमदार उपस्थित राहिले नाहीत अशा 15 ते 17 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे, उर्वरित आमदार आमच्या सोबत असल्याचा दावाही अजय चौधरी यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे,अब्दुल सत्तार,तानाजी सावंत,यामिनी जाधव,भारत गोगावले,अनिल बाबर,महेश शिंदे,संदीपान भुमरे,संजय सिरसाट,बालाजी किणीकर,प्रकाश सुर्वे,लता सोनवणे या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.