नवी दिल्ली – कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करत चला नवी सुरवात करूया असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे .
शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. सुरुवातीला गुरु नानक यांनी महत्त्वाची शिकवण दिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या असल्याचं मोदी म्हणालेत. तसंच माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोत्तम प्राधान्य दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधानांनी आजच्या संबोधनात संदेशात शेतकऱ्यांच्या योजनांबाबत महत्त्वाची दिली आहे.
गेल्या 4 वर्षांत 1 लाख कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. तसंच केंद्र सरकारचं कृषी बजेट पहिल्यापेक्षा 5 पटीनं वाढल्याचं ते म्हणालेत. शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 62 हजार कोटी रुपये थेट जमा केले. अधिकाधिक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ दिल्याचंही त्यांनी सांगितलं.100 पैकी 80 शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे. शेतकऱ्यांसाठी कृषीकर्ज दुप्पट केलं. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठीच तीन कृषी कायदे आणले. पंतप्रधानांकडून कृषी कायद्यांचं कृषी प्रदर् पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असतील. पण उत्तर प्रदेशला रवाना होण्यापूर्वी त्यांना देशाला संबोधित केलं. पीएमओनं या संदर्भातलं ट्विट करुन माहिती दिली होती