औरंगाबाद – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा रोज वाढत असलेला आकडा पाहता 30 मार्च च्या रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन लावण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने मागे घेतला आहे .औरंगाबाद शहरात आज मध्यरात्रीपासून लागू होणार लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे, पुढील आदेश येईपर्यंत शहरात लॉकडाऊन नसणार आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे
औरंगाबाद शहरात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने आधी कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर आता 10 दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. 30 मार्च ते 8 एप्रिल अशी तारखी सुद्धा ठरली होती. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी आज 30 मार्च रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन सुनिल चव्हाण यांनी औरंगाबादेत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय रद्द केला आहे.