विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर निवडणूक मग ती ग्रामपंचायत असो की लोकसभा, विधानसभा प्रत्येक ठिकाणी पक्षीय बांधणी आणि पक्षीय एकोपा असल्यास विजय पदरात नक्कीच पडतो. मात्र राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजप अंतर्गत कलह विशेषतः चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल असलेली पक्षांतर्गत नाराजी भोवली हे स्पष्ट आहे. ग्राउंडवर काम करणारा एक उमेदवार विरुद्ध पक्षाच्या जीवावर लढणारा दुसरा […]
भाजपच्या केंद्रशासित प्रदेशात क्षीरसागर यांचा चंचू प्रवेश !
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर . बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात ज्या घराण्याचा दबदबा आहे त्या क्षीरसागर घराण्यातील थोरले क्षीरसागर अर्थात जयदत्त क्षीरसागर यांनी मराठवाडा शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना पाठिंबा देत एक प्रकारे भाजप हाच आपला भविष्यातील पर्याय असेल हे स्पष्ट केले आहे. मात्र थोरल्या क्षीरसागर यांच्या भाजपमधील या चंचू प्रवेशावर […]
वाचा विचार करा,प्रेम खरं कोणाचं !जन्मदात्याचं की नव्या ओळखीचं !!
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा,आपला धर्म,जात,पंथ लिंग काय असावे हे नक्कीच आपल्या हातात नाहीये पण जन्म झाल्यावर कस जगायचं,कस वागायचं,कस बोलायचं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे.पण अलीकडच्या काळात स्वातंत्र्य,फ्रीडम, जगण्याचा हक्क या सगळ्या नावाखाली नवी पिढी हेलकावे खात असल्याचे दिसून येत आहे. आम्ही 18 वर्षाचे झालो म्हणजे आम्हाला सगळी […]
राजकारण,समाजकारण, शेती,क्रीडा क्षेत्रातील धुरंदर !!
लक्ष्मीकांत रुईकर / विशेष संपादकीय काही माणसाचं राजकारण,समाजकारणातील स्थान अढळ असतं. त्यामागे त्यांचा त्याग,अनुभव आणि समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती कारणीभूत ठरते. गेल्या पाच दशकापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणावर अन समाजकारणावर ज्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे ते व्यक्तिमत्त्व म्हणजे माजीमंत्री शिवाजीराव पंडित उपाख्य दादा.शेती असो की मराठा समाजाचे आंदोलन अथवा राजकारण प्रत्येक क्षेत्रात दादांनी सक्रिय सहभाग […]
पंकजा मुंडे अन अर्धवाक्य ……!
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर सनसनीखेज शोधण्याच्या नादात मीडिया कशाप्रकारे विपर्यास करतो अन अनेकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो हे सर्वांना ज्ञात आहेच.अशीच एक ब्रेकिंग न्यूज कालपासून जिल्हाभरातील मिडियामधून सुरू आहे.भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा आपलं राजकारण संपवू शकत नाहीत अस वक्तव्य केल्याचा व्हिडीओ इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखवायला सुरवात केली […]
समांतर सत्ताकेंद्र !
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर राजकारणातील दोन दिग्गजांचा आज वाढदिवस, हे दोन्ही दिग्गज म्हणजे स्वभावाने अगदी दोन टोकं म्हणावी लागतील ,यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही . एक कायम उपेक्षित दुर्लक्षित आणि दुष्काळी असलेल्या विदर्भातला तर दुसरा कायम संपन्न सुखी आणि सुजलाम-सुफलाम असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातला मात्र राजकीय पटलावर पश्चिम महाराष्ट्राच्या […]
पोलिटिकल सर्जिकल स्ट्राईक ……..!
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर जिथं सर्वसामान्य माणसांची बुद्धी किंवा वैचारिक पातळी संपते तिथून पुढं राजकारणी लोकांची सुरू होते अस म्हणतात याचा अनुभव गुरुवारी तमाम महाराष्ट्राने घेतला.अडीच वर्षे सरकारला सळो की पळो करून सोडणारे फडणवीस,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राजकारणातील तथाकथित भीष्माचार्य शरद पवार या सगळ्यांनाच भाजपच्या विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांच्या एका निर्णयाने असा धक्का दिला […]
अकेला देवेंद्र और क्या क्या करेगा !!
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर राजकारणात एकतर शब्द देऊ नये अन दिला तर तो शब्द शेवटपर्यंत पाळावा तरच तुम्ही सर्वमान्य नेते होऊ शकता हे सत्य आहे.अन या सत्याच्याच आधारावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेच्या आखाड्यात पवार आणि ठाकरे यांच्यासारख्या पहिलवानांना धूळ चारली. फडणवीस यांच्या खेळीने महाविकास आघाडी अजूनही भानावर येऊ शकलेली नाही हे विशेष.अडीच वर्षे मुख्यमंत्री […]
गोपीनाथ मुंडे आज असते तर ….!
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर, बीड. गोपीनाथ पांडुरंग मुंडे , कायमस्वरूपी मागासलेला हा शिक्का कपाळी घेवून मिरवणाऱ्या बीड जिल्ह्यातील नाथरा सारख्या गावातून 60 – 70 च्या दशकात हा तरुण पुढे येतो अन दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारतो.ऊसतोड कामगारांच्या पोटी जन्म घेतलेल्या या व्यक्तिमत्वाने आपल्या आयुष्यातील प्रत्येक श्वास हा सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी वेचला. काळांन घात केला अन […]
वाळू असो की ऊस अथवा आग दुर्घटना घडल्यावर प्रशासन का जागे होते ?
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर कोणतीही दुर्घटना घडली की प्रशासन तातडीने जागे झाल्यासारखे करते,मंत्री संत्री,जिल्हाधिकारी, तहसीलदार पासून सगळे झाडून पुसून भेटी देतात.राजकीय पक्षाचे पदाधिकारी पर्यटन केल्याप्रमाणे भेटीगाठी देऊन सांत्वन करतात अन पुन्हा नव्या दुर्घटनेपर्यंत हातावर हात धरून बसतात.हे चित्र गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे दिसते.हा मानवी स्वभावातील दोष म्हणायचा की पाट्या टाकण्याची सरकारी मनोवृत्ती म्हणायची . […]